• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

“चंद्रकांत दादा हे आयत्या बिळावरील नागोबा” : जयंत पाटील

tdadmin by tdadmin
February 15, 2021
in सांगली जिल्हा
0
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

सांगली : सांगली येथील भावे नाट्य मंदिरात जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात जाणारे स्मार्ट ग्राम पुरस्कार आणि आदर्श शाळा उपक्रमाचा उद्घाटन जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘पुण्यातील चांगले काम करणाऱ्या एका महिलेने कोथरूड मतदारसंघ मजबूत केला होता. माजी आमदार मेधा कुलकर्णी विकासकामांच्या जोरावर मतदार संघावर जोरदार पकड निर्माण केली. पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असे सांगणाऱ्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांना स्वतःचा कोल्हापूर जिल्हा सोडून पुण्यातील मतदार संघात निवडणूक लढवावी लागली.

ज्यांनी मतदार संघात पकड निर्माण केली त्या मेधा कुलकर्णी यांना बाजूला ढकलून चंद्रकांतदादा यांनी निवडणूक लढवली. चंद्रकांत दादा हे आयत्या बिळावरील नागोबा आहेत. त्यामध्ये कसला पुरुषार्थ आहे. स्वतःच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना मतदारसंघ न मिळणे यावरून त्यांची जिल्ह्यातील ताकद काय आहे, ते दिसून येते,’ असं जयंत पाटील म्हणाले.

 

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका असल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘पडळकर यांच्या बोलण्यातून भाजप किती खालच्या स्तरावर गेलेला आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजले आहे. महाराष्ट्रातील भाजपची सत्ता गेल्यामुळे वरिष्ठ नेते हताश झाले आहेत. त्यामुळे पक्षच नैराश्यात असल्याचे दिसत आहे. खालच्या स्तरावर जाऊन विरोधकांवर टीका केली जात असताना त्या पक्षाला काही वाटत नाही हे दुर्दैवी आहे. त्यांना पक्षाची चिंता वाटू लागली आहे. भाजप हा पक्ष कसा टिकवायचा अशी समस्या भेडसावत असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. प्रसिद्धीच्या मोहापायी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात येत आहे. चुकीचे बोलणाऱ्यांचे समर्थन करणे योग्य नाही. त्यामुळे शरद पवारांवरील होत असलेली टीका थांबावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Tags: #NCP
Previous Post

व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांचे खास गाणे रिलीज

Next Post

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

Next Post

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…तर फडणवीस सरकारने तेव्हाच गुन्हा दाखल केला असता : कॉंग्रेस नेत्याने दिले भाजपाला प्रत्युत्तर

…तर फडणवीस सरकारने तेव्हाच गुन्हा दाखल केला असता : कॉंग्रेस नेत्याने दिले भाजपाला प्रत्युत्तर

February 27, 2021
पदोन्नतीतील आरक्षण बाबत महाराष्ट्र शासनाकडून दिशाभूल : रिपब्लिकन स्टुडंट युनियन

पदोन्नतीतील आरक्षण बाबत महाराष्ट्र शासनाकडून दिशाभूल : रिपब्लिकन स्टुडंट युनियन

February 27, 2021
‘त्यांचा कुणीतरी मोठा बाप आहे तिथे तो त्यांना सांगत असावा’ : चित्रा वाघ

चित्राताई तुमच्या पतीवर कोणता गुन्हा दाखल आहे हे तरी जनतेला सांगा : काँग्रेस नेत्याने दिले आवाहन

February 27, 2021
“स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर” : नारायण राणे

“स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर” : नारायण राणे

February 27, 2021
इंधन दरवाढीबाबत पेट्रोलियम मंत्र्यांनी केले अजब विधान

इंधन दरवाढीबाबत पेट्रोलियम मंत्र्यांनी केले अजब विधान

February 27, 2021
‘राज्याचे मुख्यमंत्री कुठल्याही गोष्टीपासून अनभिज्ञ नाहीत, तपास पूर्ण होऊ द्या, मग बोलू’ : संजय राऊत

‘राज्याचे मुख्यमंत्री कुठल्याही गोष्टीपासून अनभिज्ञ नाहीत, तपास पूर्ण होऊ द्या, मग बोलू’ : संजय राऊत

February 27, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143