• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

भाजपा नेते शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडण्याच्या तयारीत : शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा खळबळजनक दावा

tdadmin by tdadmin
January 30, 2021
in राजकीय
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


नवी दिल्ली : सिंघू सीमेवर सुमारे दोनशे जणांच्या जमावाने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या मोठय़ा फौजफाटय़ातही शेतकऱ्यांवर दगडफेक आणि मारहाण केली. त्यांच्या तंबूंची मोडतोड केली. त्यामुळे आंदोलनस्थळी शुक्रवारी दिवसभर तणाव निर्माण झाला होता.


सिंघू सीमेवरही पोलिसांनी कारवाई केल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान याच गोंधळादरम्यान भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता व शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शुक्रवारी रात्री एक खळबळजनक दावा केला आहे. टिकैत यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.


टिकैत यांनी शुक्रवारी रात्री ट्विटरवरुन अनेक भाजपा नेते शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे. “मला आज अनेक भाजपा नेत्यांचे फोन आले. त्यांनी आम्ही सुद्धा राजीनामा देत आहोत असं मला सांगितलं आहे. पक्षात राहून अशाप्रकारे आम्ही शेतकऱ्यांचा अपमान पाहू शकत नाही. अजूनही आम्ही गप्प राहिलो तर येणारी पिढी आम्हाला कधीच माफ करणार नाही, असं हे नेते म्हणाले,” असं ट्विट टिकैत यांनी केलं आहे.


टिकैत यांनी शनिवारी सकाळीही एक ट्विट केलं असून मोठ्याप्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर पुन्हा जमा होण्यासाठी निघाले असल्याचं म्हटलं आहे. “आज सकाळपासूनच गावांमधून ट्रॅक्टर निघण्यास सुरुवात झालीय. गाझीपूर सीमेवर आज कालपेक्षा अधिक शेतकरी पोहचणार आहेत,” असं टिकैत यांनी म्हटलं आहे.


मी आंदोलन गुंडाळून निघून जाऊ शकलो असतो किंवा स्वत:ला अटकही करून घेतली असती पण, तसे केले असते तर, शेतकऱ्यांवर देशद्रोहाचा डाग लागला असता, तो कधीही पुसला गेला नसता आणि हेच मला मान्य नाही. आंदोलनाविरोधात षडयंत्र रचले असून आता मी जीव गेला तरी हटणार नाही, असे टिकैत यांनी शुक्रवारी दिलेल्या भाषणात म्हटलं आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Previous Post

अभिनेत्री कंगना रानौत पंतप्रधान भूमिकेत

Next Post

भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना 19 वर्षीय जवानाला वीरमरण

Next Post

भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना 19 वर्षीय जवानाला वीरमरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत” : विनायक राऊत

“जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत” : विनायक राऊत

February 25, 2021

दोन मिनिटांच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी बहुधा कानात सांगितलं असावं… : भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला

February 25, 2021
भारताच्या “या” माजी क्रिकेटपटूचा भाजपामध्ये प्रवेश

भारताच्या “या” माजी क्रिकेटपटूचा भाजपामध्ये प्रवेश

February 25, 2021
सर्वसामान्यांना फटका : पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या

सर्वसामान्यांना फटका : पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या

February 25, 2021
मोटेरा स्टेडियम नामकरण : मरने से पहले स्टेडियम अपने नाम पर करा लिया। वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांची नरेंद्र मोदी यांच्यावर टिका

मोटेरा स्टेडियम नामकरण : मरने से पहले स्टेडियम अपने नाम पर करा लिया। वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांची नरेंद्र मोदी यांच्यावर टिका

February 25, 2021
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांबाबत सरकारचा मोठा निर्णय

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांबाबत सरकारचा मोठा निर्णय

February 24, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143