मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारच्या ‘हम दो हमारे दो’ धोरणावरून टीका केली होती. “हम दो, हमारे दो’चे हे सरकार आहे”, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधींच्या ‘हम दो, हमारे दो’च्या वक्तव्यावर आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी त्यांना एक सल्ला दिला आहे.

“हम दो, हमारे दो” च्या घोषणेचा वापर पूर्वी कुटुंब नियोजनासाठी केला जात होता. जर त्यांना या घोषणेचा प्रचार करायचा असेल तर त्यांनी आधी लग्न करायला हवं…आणि लग्न करायचं असेल तर त्यांनी दलित मुलीशी करावं आणि महात्मा गांधींचं जातीयवाद हटवण्याचं स्वप्न पूर्ण करावं. त्यांच्या या कृतीतून तरुणांना प्रेरणा मिळेल”, असं रामदास आठवले म्हणालेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
