Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आजपासून राज्यात तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता

0 619

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : राज्यात बुधवार ते शुक्रवार (5 ते 7 जुलै) दरम्यान अतिवृष्टीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सर्वच बाजूंनी मान्सूनचा वेग वाढल्याने संपूर्ण देशातच या तीन दिवसांत अतिवृष्टीची शक्यता आहे. गुजरात ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

 

मान्सूनचा वेग बंगालच्या उपसागरासह दिल्लीसह आसपासच्या भागांत जोरदार वाढत आहे. गुजरात ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र व गुजरात या चारही राज्यांच्या किनारपट्टीला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आणि बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनला पोषक वातावरण मिळाल्याने 5 ते 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशात अतिवृष्टीचा अंदाज देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.