पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी साईबाबांबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, “साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही. आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठं स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देवांचं स्थान दिलेलं नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणीही सिंह बनू शकत नाही.”
याशिवाय ज्यांची साईबाबांवर श्रद्धा आहे, त्यांच्या श्रद्धेला मी दुखावू इच्छित नाही, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते. पण कोणी कोल्ह्याचं कातडं पांघरुन कोणीही सिंह बनू शकत नाही, हे वास्तव आहे, संत आपल्या धर्माचे असो किंवा तुलसीदास, सूरदासही असोत, हे लोक महान असू शकतात, ते योगपुरुष असू शकतात. पण कोणीही देव असू शकत नाही, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते.
