मिरची तिखट का असते? : वाचा सविस्तर
मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे संयुग आढळते. त्यामुळे मिरची तिखट होते. मिरचीच्या मधल्या भागात कॅप्सेसिन हा घटक असतो. यामुळे मिरचीला कधी बुरशी येत नाही. कॅप्सेसिन हा घटक जिभेवर आणि त्वचेवर आढळणाऱ्या मज्जातंतूंवर प्रभाव सोडतो. कॅप्सेसिन नावाचे रसायन रक्तात सोडते ज्यामुळे मेंदूमध्ये जळजळ आणि उष्णता निर्माण होते. यामुळे मिरची खाल्ल्यानंतर जळजळ जाणवते.

कॅप्सेसिन हा घटक विरघळत नाही
कॅप्सेसिन हा घटक विरघळणारा नाही, यामुळे त्याचा तिखटपणा पाणी पिल्यानंतरही जात नाही. मिरची खाल्ल्यानंतर जेव्हा तिखटपणा जाणवतो तेव्हा नेहमी दूध, दही, मध आणि साखर खा. यामुळे तिखटपणा जाणवणार नाही.