माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १८ मार्च २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील बेरोजगार युवक-यवती यांना ५० टक्के पगारावरती भरती करून घ्यावे या मागणीसाठी सोमवार दिनांक २० मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वा. आटपाडी बस स्थानक पासून भव्य महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महेश देशमुख (सर) व संभाजी देशमुख यांनी दिली.
शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार यांना दरमहा २५ हजार रुपये पेन्शन मिळावी. तसेच तालुक्यातील जे बेरोजगार युवक-युवती आहेत त्यांना ५० टक्के पगारावरती भरती करून घ्यावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सदर मोर्चाची सुरुवात ही आटपाडी बस स्थानक पासून सोमवार दिनांक २० रोजी सकाळी ११ वा. सुरु होणार आहे. हा मोर्चा मेन व्यापारी पेठ मार्गे तहसीलदार कार्यालयापर्यंत निघणार आहे.

त्यामुळे आटपाडी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार तसेच जे बेरोजगार युवक-युवती आहेत त्यांनी या मोर्चा मध्ये सहभागी होवून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन या मोर्चाचे संयोजक महेश देशमुख (सर) व संभाजी देशमुख यांनी केले असून, एकीकडे जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तर दुसरीकडे आम्हाला काम द्या. आम्ही अर्ध्या पगारात काम करायला तयार आहे. अशी मागणी करत बेरोजगार मोर्चा काढणार असल्याने हा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
हे ही वाचा
* गौरवास्पद : आटपाडी पोलीस ठाणेच्या दोघांचा पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते सन्मान
* सांगली : भाजप नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या : हल्लेखोर पसार
* ब्रेकिंग : किसान सभेच्या लॉंग मार्चमधील शेतकऱ्याचा मृत्यू