नाशिक : पहाटेच्या शपथविधीमुळं राष्ट्रपती राजवट उठवण्यास मदत झाल्याचं विधान नुकतंच शरद पवारांनी केले. होते. त्यांच्या या विधानाला अनुसरुन प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊ यांनी भाजपला टोला लगावला आहे. शरद पवारांना समजून घ्यायला शंभर जन्म घ्यावे लागतील राऊत म्हणाले.
“जे सरकार दिल्लीत आणि महाराष्ट्रात होते त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावून महाविकास आघाडीचं सरकार येऊ नये म्हणून कोंडी केली होती. ती कोंडी फुटेल की नाही अशा शंका सगळ्यांना होती आम्ही आमदारांचं बहुमत जरी दाखवले असते तरी ज्या प्रकारचे राज्यपाल राजभवनात होते.

पण पहाटेच्या शपथविधीमुळं ही कोंडी फुटली आणि लख्ख उजाडलं. फक्त २४ मिनिटांत राष्ट्रपती राजवट निघाली दिल्लीतून आणि मविआचा मार्ग नक्कीच त्यामुळं मोकळा झाला. हे जे पवारांनी सांगितल्याचे तुम्ही सांगता तर हे सत्य आहे. शरद पवारांना ओळखायला शंभर जन्म घ्यावे लागतील असं मी मागे एकदा म्हटलं होतं तेव्हा माझ्यावर टीका झाली होती.