Latest Marathi News

BREAKING NEWS

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना ! परीक्षांपूर्वी बोर्डाने घेतला मोठा निर्णय

0 637

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा येत्या २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान घेतल्या जाणार आहे.

त्याआधीच बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देऊ नये असे आदेश केंद्रांना दिले आहे. याआधी अपवादात्मक परिस्थितीत १० मिनिटे उशीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता. मात्र, आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात यावा असे आदेश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत.

Manganga

21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता घेतली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!