पुणे: महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्या कुस्तीवेळी पंच असलेले मारूती सावत यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील एका पोलिस कर्मचाऱ्याने ही धमकी दिली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, पंच मारूती सावत यांनी केसरी स्पर्धा अध्यक्षांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलीस शिपाई संग्राम कांबळे यांनी त्यांना आज सकाळी फोन केला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दिलेल्या निर्णयावरून अभद्र भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच, तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ वाहा की मी दिलेला निर्णय खोटा आहे असं फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने म्हटलं. या संपूर्ण प्रकाराची फोन रेकॉर्डिग देखील समोर आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी सातव यांनी केसरी स्पर्धा अध्यक्षांकडे तक्रार अर्ज केली असून आता कोथरूड पोलिसांकडे करणार तक्रार आहेत.संग्राम कांबळे असं धमकी देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे.