नागपूर : शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कराव जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर आक्षेप घेतला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला गेला. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “अविश्वास ठराव आणायचाच होता तर तो अधिवेशाच्या पहिल्या दिवशीच आणायला पाहिजे होता. शेवटच्या दिवशी अविश्वास ठराव आणणं म्हणजे फुसका बॉम्ब आहे, असं बावनकुळे म्हणालेत.

तसेच ते पुढे म्हणाले, “विरोधकांचे वीस पंचवीस आमदार पुन्हा येणार आहे. 184 च्या वरती मतदान मिळतील. भावनात्मक पद्धतीने मिस अंडरस्टँडिंग करणंच विरोधकांचं काम आहे. आणि तेच हे लोक करत आहेत. सगळे विरोधक हे विधानभवनात राजकीय बोलले. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला पाहिजे, असं बावनकुळे म्हणालेत.