Latest Marathi News

BREAKING NEWS

 

“महाराष्ट्रात दुसऱ्यांचा पक्ष चोरायचा,नेते चोरायचे चालू आहे”: उद्धव ठाकरे!

0 188

नागपूर: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

 

 

यावेळी ठाकरे म्हणाले, “ज्यांच्यात कर्तुत्व नाही, काही करायची ताकद नाही मग न्यूनगंडा प्रमाणे वागतात. दुसऱ्यांचा पक्ष चोरायचा,नेते चोरायचे हे काम सध्या सुरु आहे, महाराष्ट्रात टोळींचं सरकार आहे. आज ते आरएसएस कार्यालयात गेले होते. आरएसएस कार्यालयावर ताबा सांगायला गेले होते का? यांची बुभुक्षित नजर वाईट आहे, आम्ही अनुभव घेतला आहे. ज्यांना स्वत: काही करण्याची धमक नसते, कुवत नसते ते दुसर्यांच्या गोष्टींवर हक्क सांगतात. आरएसएसने काळजी घ्यावी. दुसर्यांचे नेते, पक्ष आणि कार्यालय चोरी करण्याचे काम यांचे सुरू आहे, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.

 

 

तसेच ते पुढे म्हणाले, “सहा महिन्यांत राज्य सरकारने काय केलं? संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही काय देणार? 52000 कोटी तुम्ही कसे वापरणार याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. विदर्भाला काय देणार याचे उत्तर अजून आले नाही. उद्योग इतर राज्यात गेले, तर तरुणांना रोजगार संधी कशी मिळणार याचे उत्तर अजून आले नाही. मंत्र्यांवर होत असलेल्या आरोपातील गांभीर्य पाहता मंत्र्यांनी राजीनामे द्यायला हवे. आरोप झाल्यावर ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना क्लिनचिट द्यायची अशी काही योजना आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंना केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.