मुंबई: जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची लाट पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारअलर्टवर असून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
माहितीनुसार, गेल्या 24 तासांत म्हणजे देशात 201 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्या 3,397 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी नवीन आकडेवारी जारी केली आहे. कोरोनामुळे गेल्या 24 तासात 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, भारतातही ओमायक्रॉनच्या BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण आढल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काही राज्यांनी मास्कसक्ती लागू केली आहे.