मुंबई: राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. आजच्या कामकाजात जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्यामुळे त्यांना निलंबीत करण्यात आले आहे.
माहितीनुसार, विधिमंडळ कामकाजात विरोधी पक्षांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला होता. यावरुनच ते आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अध्यक्ष तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका असे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर गिरीश महाजन यांनी आक्रमक पवित्रा घेत तुम्ही असे बोलू शकत नाही, निलंबन करा अशी मागणी केली. या मागणीवरुन भाजपा आमदार आक्रमक झाले ज्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटे तहकुब करण्यात आले. त्यानंतर निलंबनाच्या कारवाईवर विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात बैठक सुरू झाली त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते उपस्थित आहेत. या बैठकीत विधीमंडळ सचिवांनाही बोलावले आहे.

दरम्यान, विधानसभेतील राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी निलंबीत करण्यात आले आहे.