मुंबईः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अमृत फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपिता असा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मी निशब्द झालो आहे अशी खोचक टीका केली आहे.
यावेळीही संजय राऊत म्हणाले की, नवीन नवीन ज्या भूमिका येत आहेत. त्याबद्दल आता काय बोलायचं हेच कळत नाही. त्यामुळे या वक्तव्यावर मी काहीच बोलणार नाही असं म्हणत त्यांनी त्यांना टोला लगावला.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी आपण निशब्द असल्याचा खोचक टोला त्यांना लगावण्यात आला आहे.