मुंबई: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर या प्रकरणात मनोज घरबडेसह अन्य तीन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. या तिघांना आता न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
माहितीनुसार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी महापुरुषांवर केलेल्या वक्तव्यामुळे पुण्यातच त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. त्यामुळे दोषींवर ३०७ कलमासह अन्य मोठी कलमे लावण्यात आली आहेत. शनिवारी शईफेकीची घटना घडली त्यानंतर लगेच आरोपींना ताब्यात घेण्यात आले.तसेच, ३०७ कलम खुनाचा प्रयत्न केल्यास लावले जाते. मात्र प्रत्यक्ष घटना तशी नसून पाटलांवर फक्त शाईफेक करण्यात आली होती.

दरम्यान, यात कुठेही खुनाचा प्रयत्न नसून लावण्यात आलेली कलमे चुकीची असल्याचे विरोधकांनी म्हटले. त्यानंतर मंगळवारी ३०७ कलम कमी करण्यात आले होते. कोर्टाकडून तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.