Latest Marathi News

BREAKING NEWS

 

‘या’ योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मावर सरकारकडून पालकांना मिळणार 50 हजार रुपये!

0 422

मुंबई: महाराष्ट्र शासन माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मावर सरकार ५० हजार रुपये देते. हि योजना १ एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाने सुरू केली होती. मुलींच्या आकडेवारीत सुधारणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच मिळू शकतो.

 

 

या योजनेंतर्गत आई आणि मुलीच्या नावे बँकेत जॉईंट खाते उघडले जाते आणि त्यावर १ लाख रुपयांचा अपघात विमा आणि ५००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट केला जातो. याशिवाय मुलीच्या जन्मानंतर पालकांनी नसबंदी करून घेतल्यास ५० हजार रुपये दिले जातात. दुसरीकडे, दोन मुलींच्या जन्मानंतर नसबंदी केली, तर दोन्ही मुलींच्या नावावर २५ हजार रुपये दिले जातात. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत राज्य सरकारने दिलेली रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.

 

 

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड, आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी दाखला व उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत तिसरे मूल असले तरी केवळ दोन मुलींनाच लाभ दिला जाणार आहे.

 

अर्ज कसा करायचा –

महाराष्ट्र सरकारने देऊ केलेल्या या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

येथे तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल. अर्ज डाउनलोड केल्यानंतर, फॉर्म पूर्णपणे भरावा लागेल.सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती महिला व बाल विकास कार्यालयात जमा करावी लागतील.(सौ. साम)

 

Leave A Reply

Your email address will not be published.