यवतमाळ : यवतमाळ अमरावती महामार्गावर बस व कारचा भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील चौघे जागीच ठार झाले आहेत. तर बसमधील तेरा प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, यवतमाळकडून अमरावतीकडे कार जात असताना अमरावतीवरून यवतमाळकडे येत असलेल्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. या घटनेत राजेश इंगोले, रजनी इंगोले (रा. यवतमाळ), वैष्णवी गावंडे (रा. वाशिम) आणि सारीखा चौधरी (रा. पुसद, यवतमाळ)हे कारमधील चार जण जागीच ठार झाले. तर बसमधील तेरा जण गंभीर जखमी झाले.

दरम्यान, काही सामाजिक कार्याकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमींना उपचारासाठी रवाना केले.