Latest Marathi News

BREAKING NEWS

“आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?” : टाटा एअरबस प्रकल्पावरुन ‘यांचा’ राज्य सरकराला प्रश्न!

0 265

मुंबई: वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावर जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता जयंत पाटील यांनी देखील या प्रकरणावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

 

याबाबत पाटील यांनी ट्विट करत म्हटले की, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होते. महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का ? असा प्रश्न सध्या पडत आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात ? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!