बीड: बीडच्या गेवराई तालुक्यातील नंदपूर कांबी येथे शेतकरी महिलेने दिवसभर कापूस वेचला पण वेचलेला कापूसही भिजला. आता घर कुटुंब चालवायचं कस? या विवचणेतून महिला शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सविता मुळे असे आत्महत्या केलेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मयत महिलेचे पती अपंग आहेत. दोन मुलांसह महिला घर चालवत होती, शेती करत होती. मात्र गेल्या आठवडा-भरापासून जिल्ह्यात प्रचंड पाऊस सुरू आहे. त्या दरम्यान शेतातला कापूस तर भिजलाच, वेचलेला कापूसही भिजला. आता वर्ष कसं घालवायचं ? या चिंतेत आणि नैराश्येतून या शेतकरी महिलेने आत्महत्या केली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती तलवाडा पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तसेच, या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.