आटपाडी: दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जुलै महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचे महत्त्व नेमके काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
3 जुलै : प्लास्टिक बॅग मुक्त दिन

3 जुलै : विनायक चतुर्थी
1852 : महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.
1909 : कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ बॅरिस्टर व्ही. एम. तथा भाऊसाहेब तारकुंडे यांचा जन्म.
1350 : संत नामदेव यांनी समाधी घेतली.
2000 : विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रुपांतर करण्यास नौदल, राज्यसरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छिमार प्रतिनिधींनी मान्यता दिली.
1850 : साली भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने आलेल्या इंग्लंड देशातील इस्ट इंडिया कंपनीने भारतावर राज्य केलं. भारतावर राज्य करीत असतांना त्यांनी आपल्या देशांतील बहुमोल्य हिरा कोहिनूर आपल्या सोबत घेऊन गेले.
1998 : साली प्रसिद्ध भारतीय गीतकार व कवी तसचं, ऐ मेरे वतन के लोगों या देशभक्तीपर गीताचे रचनाकार कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.