‘उद्धव ठाकरे यापुढेही जनतेच्या कायम लक्षात राहतील ‘: “या” राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याची पहिली प्रतिक्रिया!
मुंबई : बहुमत चाचणी होण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले,’राज्याच्या विकासासाठी शरद पवारांनी तिन्ही पक्षांना एकत्र करून सरकार स्थापन केले होते. अडीच वर्षात विकासासाठी काम केले. लोकांच्या हितासाठी कटिबद्ध मुख्यमंत्री राज्याला मिळाला होता. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा आहे. बंडखोर आमदारांचे पाठबळ नाही हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यांनी कोरोना काळात चांगले काम केले. उद्धव ठाकरे यापुढेही जनतेच्या कायम लक्षात राहतील. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला कायम पाठिंबा दिला आहे. पुढच्या काळात सर्व एकत्र बसून ठरवू’

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने उद्याच बहुमत चाचणी होणार असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला उद्या ३० जूनलाच बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीची स्थगिती रोखली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधून मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषद सदस्याचाही राजीनामा दिला आहे.